Pravin Andhale
Posted on : 29 Jul 2020
तू जाणार, कुणाला काही फरक नाही पडणार!
दुसऱ्या दिवशी लोक 'चांगला होता!' असं म्हणणार,
आणि लगेच आपापल्या कामात व्यस्त होणार!
तू जाणार, कुणाला काही फरक नाही पडणार!
होतास तोवर लोकं तुला नाही समजून घेणार,
गेल्यावर मात्र हळहळ व्यक्त करणार!
तू केलेल्या चांगल्या कामाची आठवण काढणार,
'तू होतास म्हणूनच करू शकलास ते!' असे निष्कर्ष काढणार!
तू जाणार, कुणाला काही फरक नाही पडणार!
'चांगल्या व्यक्तींना देव लवकर बोलवतो!' , ' व्यसन नसून पण लवकर गेला तो!' अस काहीही बोलून लोकं त्यांच्या मनाचं समाधान करणार!
तुझ्या जाण्याने त्यांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरं देणार... नेमकी उत्तरं तर मिळणारच नाहीत, म्हणून काही तरी समज करून घेऊन, चालत राहणार आपल्या आयुष्यात!! मिळेल त्या वाटेनं!
म्हणूनच म्हणतोय, तू जाणार, कुणाला काही फरक नाही पडणार!!!!
Aug 1, 2020
- 1
चांगलं कर्म करण्याचा आनंद लुटायचा, बाकी कुणाला फरक पडेल किंवा न पडेल. आपण नसण्याने कुणाला काहीच फरक पडत नसतो. छान भावना व्यक्त केल्या आहेत 👌👌👌
Posted on : 29 Jul 2020
33